ग्रामपंचायत बारूळ

ग्रामपंचायत बारूळ

ता.धाराशिव जि.तुळजापूर  

Shri Devendra Fadnavis
माननीय मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस
Shri Eknath Shinde
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
Shri Ajit Pawar
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. अजित पवार
Shri Jaykumar Gore
माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. जयकुमार गोरे
Shri Yogesh Kadam
माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. योगेश कदम
Shri Eknath Dawale
प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. एकनाथ डवले
Varsha Thakur
जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी.धाराशिव
श्री. किर्ती किरण पुजार (भा.प्र.से.)
Rahul Kumar Meena
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव
श्री. डॉ. मैनाक घोष (भा.प्र.से)
anant
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत),जिल्हा परिषद धाराशिव
श्री.अनंत कुभार
Img
गट विकास अधिकारी,तुळजापूर
श्री. हेमंत भिंगारदेवे
Img
सरपंच – बारूळ ग्रामपंचायत सौ. सिंधू शिवाजी सुपनार
Img
उप-सरपंच– बारूळ ग्रामपंचायत श्री. भास्कर रंगा सगट
Img
ग्रामपंचायत अधिकारी –बारूळ ग्रामपंचायतश्री. प्रशांत भोसले

गावा विषयी

ग्रामपंचायत बारूळ (Barul ) हे महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात वसलेले एक प्रगत, स्वच्छ व सुसंस्कृत गाव आहे. स्वच्छता, शिक्षण, आरोग्य व लोकसहभागाच्या माध्यमातून गावाने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे बारूळ गावाने “स्वच्छ व हरित गाव (Clean and Green Village)” म्हणून विशेष ओळख निर्माण केली आहे. हे गाव धाराशिव लोकसभा मतदारसंघात व तुळजापूर विधानसभा मतदारसंघात मोडते.

बारूळ गाव तुळजापूर शहरापासून सुमारे १७ कि.मी. अंतरावर असून जिल्ह्याचे मुख्यालय धाराशिवपासून सुमारे ४० कि.मी. अंतरावर आहे.
हे गाव ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असून नळदुर्ग किल्ला हे जवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे आणि तुळजापूर शहराच्या जवळ आहे आणि हे गाव तुळजापूरच्या धार्मिक आणि ऐतिहासिक परिसराचा एक भाग आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार बारूळ गावाची एकूण लोकसंख्या २,४८२ इतकी असून गावात ५५९ कुटुंबे वास्तव्यास आहेत. गावाचा साक्षरता दर समाधानकारक असून शिक्षणाच्या बाबतीत गाव सतत प्रगती करत आहे.

गावात भव्य ग्रामसंसद भवन बांधण्यात आले असून या कार्यालयामार्फत आपले सरकार सेवा केंद्र चालवले जाते. या केंद्राद्वारे सर्व नागरिकांना वेळेवर संगणकीकृत दाखले व ऑनलाईन सेवा दिल्या जातात.

गावात हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी आणि महादेव मंदिर ही प्रमुख धार्मिक स्थळे आहेत. स्मशानभूमीमध्ये वृक्ष लागवड, पिण्याचे पाणी, बाकडे व शेडची व्यवस्था करण्यात आली असून ते ठिकाण अत्यंत निसर्गरम्य आहे.

गावातील प्रत्येक घरात ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी दोन कचरा कुंड्या देण्यात आल्या आहेत.
अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळांची रंगरंगोटी, डिजिटल शिक्षण प्रणाली, प्रोजेक्टर व सुंदर बेंचेस यांच्या साहाय्याने विद्यार्थी १००% उपस्थित राहून शिक्षण घेत आहेत.

लोकसंख्या
0
कुटुंब संख्या
0
पंचायत सदस्य
0
क्षेत्रफळ
0
प्रकल्प चालू
0

सरपंच सौ. सिंधू शिवाजी सुपनार...

ग्रामपंचायतीच्या कार्यभाराची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, गावातील सर्व ग्रामस्थ, ग्रामसेवक, सदस्य आणि विविध विभागांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीने सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय सुरू केला आहे.

ग्रामपंचायतीने “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना”जनसुविधा योजना यांच्या अभिसरणातून अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी गायींचे गोठे उभारणी, निराधार, अपंग, विधवा व ज्येष्ठ नागरिकांसाठी मानधन योजना, तसेच महिला बचत गट प्रशिक्षण, रोजगार निर्मिती उपक्रम, बोलकी शाळा, बोलकी अंगणवाडी, सौर ऊर्जेवर चालणारी ग्रामपंचायत यांचा समावेश आहे.

तसेच ओला व सुका कचरा व्यवस्थापन, गाव अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण, शेतरस्ते विकास, बालविवाह बंदी, प्लास्टिक बंदी यांसारख्या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातील नागरिकांच्या सहभागातून पारदर्शक प्रशासन, स्वच्छता, आणि सतत प्रगती यांचा आदर्श उभा केला आहे.

आमचे उद्दिष्ट केवळ भौतिक विकास नव्हे, तर शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि महिलांच्या सक्षमीकरणाद्वारे सामाजिक विकास साधणे हे आहे. गाव आदर्श आणि स्मार्ट ग्रामपंचायत बनविण्याच्या दिशेने निश्चितपणे पुढे जात आहे.

बारूळ गावाचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, शिक्षण व नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे बारूळ ग्रामपंचायत आदर्श दिशेने वाटचाल करत आहे

“गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांचे सहकार्य हीच आमची खरी ताकद आहे.”

— सौ. सिंधू शिवाजी सुपनारे
सरपंच, बारूळ

📝 नागरिकांसाठी तक्रार / अभिप्राय

नागरिकांसाठी तक्रारी व अभिप्राय ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. आपल्या समस्येची माहिती देऊन ग्रामपंचायतीस सहकार्य करा.

➡️ तक्रार / अभिप्राय नोंदवा
तारीख नोटिस शीर्षक तपशील
०४ ऑक्टोबर २०२५
ग्रामसभा सूचना
पुढील ग्रामसभा दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ५:०० वाजता ग्रामपंचायत भवन येथे होणार आहे. सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे.
३० सप्टेंबर २०२५
पाणीपुरवठा बंद सूचना
ग्रामपंचायत हद्दीत देखभाल कामांमुळे १ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायं. ५ या वेळेत पाणीपुरवठा बंद राहील.
२५ सप्टेंबर २०२५
ग्रामपंचायत कर भरणा सूचना
२०२५-२६ वर्षाकरिता घरपट्टी व पाणीकर भरण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२५ आहे. वेळेत भरणा करा.
  • जल जीवन मिशन” अंतर्गत नवीन पाईपलाईन बसविण्याचे काम सुरू.

  • गावात सौर ऊर्जेवर आधारित रस्ते दिवे बसविण्याचा प्रकल्प मंजूर.

  • स्वच्छ ग्राम – हरित ग्राम” उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे.

  • ग्रामपंचायत कार्यालयात डिजिटल पेमेंट काउंटर सुरू.

  • नागरिकांसाठी “SmartGaav Citizen Portal App” लवकरच उपलब्ध होणार.

दाखवण्यासाठी उपलब्ध माहिती नाही

लवकरच आवश्यक तपशील येथे उपलब्ध केले जातील..

दाखवण्यासाठी उपलब्ध माहिती नाही

लवकरच आवश्यक तपशील येथे उपलब्ध केले जातील..

दाखवण्यासाठी उपलब्ध माहिती नाही

लवकरच आवश्यक तपशील येथे उपलब्ध केले जातील..

दाखवण्यासाठी उपलब्ध माहिती नाही

लवकरच आवश्यक तपशील येथे उपलब्ध केले जातील..

प्रमुख कार्यक्रम

लाभार्थी रजिस्टर

सरकारी योजना

गावातील छायाचित्रे , ध्वनिचित्रफित

छायाचित्र दालन

आमच्या चॅनलवर सरकारी योजना, आणि कृषी विषयावरील महत्वाचे व्हिडिओ पाहा.

आमच्या Facebook पेजला लाईक करा आणि सरकारी योजना अपडेट्स पहा

 आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा आणि सरकारी योजना व कृषी अपडेट्स मिळवा.

Instagram वर आम्हाला फॉलो करा — ताज्या अपडेट्ससाठी.कार्यक्रम आणि घोषणा यांचे अपडेट्स